मोठी बातमी – केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून १७ वर्षीय युवकाचा खून


दक्ष न्यूज प्रतिनिधी: प्रवीण सुरुडे

नाशिक : शहरामध्ये १७ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आली आहे. पंचवटीतील पेठरोड, कर्नल नगर येथील रहिवासी असणाऱ्या आशिष रणमाळेची गुरुवारी (३० मे) रात्री हत्या करण्यात आली. आशिष रणमाळे हा १७ वर्षांचा होता. धक्कादायक बाब म्हणजे आशिषच्याच जवळच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच मित्राच्या वाढदिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून आशिषचे भांडण झाले होते. हाच राग मनात ठेवून तीन अल्पवयीन मित्रांनी धारदार हत्याराने आशिषची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची अधिक तपास केला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *