देश

दक्ष ब्रेकिंग न्यूज | केंद्र सरकारचं मोठं पाऊल – पाकिस्तानविरुद्ध कडक निर्णयांची मालिका


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

नवी दिल्ली | केंद्र सरकारने पाकिस्तानच्या कुरापतींना आता ठोस प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला असून आज एकामागून एक मोठे निर्णय जाहीर करत, देशात तीव्र हालचालींना सुरुवात झाली आहे. कायदेशीरदृष्ट्या बळकट आणि आक्रमक पावलं उचलत भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर धोरणे राबवण्यास सुरुवात केली आहे.

संपूर्ण देशात खळबळ उडवणारे निर्णय:

  • सिंधू पाणी करार तात्काळ रोखला: पाकिस्तानला पाण्याचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय. आता सिंधू नदीच्या पाण्याचा भारतासाठीच वापर होणार.
  • पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही: नव्या आदेशानुसार, कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतात प्रवेश मिळणार नाही.
  • ४८ तासांची डेडलाइन: सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना पुढच्या ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश.
  • अटारी बॉर्डर बंद: भारत-पाक दरम्यानची मुख्य सीमा अटारी बॉर्डर पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
  • भारतीय नागरिकांना इशारा: पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना तात्काळ भारतात परत यावं, असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलं.
  • पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हटवलं: भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं.
  • सर्वपक्षीय बैठक बोलावली: या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा होणार.
  • सैन्य सज्ज!थलसेना, नौदल आणि हवाई दलाला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले.

शांततेच्या सीमारेषेवर तणाव

या घडामोडींमुळे देशात सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. जम्मू-काश्मीरपासून पंजाबपर्यंत सीमावर्ती भागात सेना तैनात करण्यात आली आहे.

भारत सरकारची भूमिका स्पष्ट – “आता बस झालं!”

केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, “भारत आता शांत बसणार नाही. दहशतवाद्यांना, त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्राला आणि अशा मानसिकतेला आता कठोर उत्तर दिलं जाईल,” असा थेट इशारा दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *