दक्ष न्यूज| पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून तीव्र निषेध – अशोक स्तंभावर निदर्शने
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेले अमानुष आणि धर्माधारित दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. नाशिक महानगर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कडून अशोक स्तंभ येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

या निदर्शनावेळी परिसरात “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “आतंकवाद नहीं सहेंगे” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वातावरण देशभक्तीमय आणि रोषपूर्ण झालं होतं.
“दहशतवाद्यांना पुन्हा सर्जिकल स्ट्राइकने उत्तर द्या!” – ओम मालुंजकर
ABVP चे प्रदेश सहमंत्री व महानगर मंत्री ओम मालुंजकर यांनी या निदर्शनादरम्यान केंद्र सरकारकडे ठाम मागणी केली की, “इस्लामिक दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या पाठबळावर हिंदू भाविकांची हत्या करत आहेत. हे भारत कधीही सहन करणार नाही. केंद्र सरकारने याआधी सर्जिकल स्ट्राइक व एअर स्ट्राइकने दिलेले प्रत्युत्तर आठवावे. अशाच प्रकारे चौख कारवाई पुन्हा करावी.”
दहशतवादावर कठोर कारवाईची मागणी
या हल्ल्यामध्ये देशाच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारावर लक्ष्य करून गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकारामुळे जनमानसात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ABVP ने हा हल्ला “मानवतेवर कलंक” असल्याचे म्हटले असून, केंद्र सरकारला निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
निदर्शनात अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती
या निदर्शनात प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे, महानगर सहमंत्री पियुषा हिंगमीरे, अक्षता देशपांडे, व्यंकटेश औसरकर, सातपूर नगर मंत्री योगेश महाजन, कॉलेज रोड नगर मंत्री मोनाली महाजन, सार्थक आहेर, शुभम कुलकर्णी, KTHM कॉलेज अध्यक्ष अश्विनी राठोड, आणि अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशावर वार करणाऱ्यांना निष्काळजीपणाची माफी नाही – हे या निदर्शनातून ABVP ने ठणकावून सांगितले आहे.