प्रभाग क्र. 29 मधील समस्यांबाबत शिवसेनेचे विभागीय अधिकारी पाटील यांना निवेदन
नाशिक: दक्ष प्रतिनिधी
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये आरोग्य सह विविध समस्यांमुळे नागरिक संकटात सापडले आहेत , सगळीकडे कोरोना संकट असताना सध्या यांच्यासह अनेक साथींच्या रोगांनी थैमान घातले आहे शहरांमध्ये सगळ्यात जास्त चिकुंगुण्या चे रुग्ण सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 29 मधील दत्त चौक विजय नगर संभाजी चौक साईबाबा नगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आडलुन येत आहे याचे मुख्य कारण हे परिसरातील कचऱ्याचे असणारे साम्राज्य, रस्त्यात पडलेले खड्डे, त्यात साचलेले पाणी , परिसरातील मोकळ्या भूखंडावर असलेले घाणी चे साम्राज्य ,गार्डन परिसरात असलेल्या स्वच्छता, उघडयावर सोडलेले सांडपाणी ,भाजी मार्केट परिसरात दुर्गंधी हे आहे, पालिकेच्या वतीने कुठलीही साफसफाई, औषध फवारणी केली जात नसल्याने दिवसेंदिवस नागरिकांच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे ,त्यामुळे तात्काळ परिसरात जंतुनाशक दूर फवारणी ,औषध फवारणी, स्वच्छता मोहीम राबवणे व स्वच्छ करून या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवावे.
प्रभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ,खुप ञास नागरिकांना सहन करावा लागत आहे ,पहिलेच कोरोना महामारी मुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे त्यात साथीच्या रोगांनी तोंडवर काढल्यामुळे प्रत्येक माणसाला आरोग्याच्या अनेक अडचणी निर्माण होऊन नागरिक हतबल झाले आहे लवकरात लवकर या समस्येतून प्रभाग क्रमांक 29 मधील जनतेला मुक्त करावे अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारू,असे निवेदन शिवसेना विभाग प्रमुख सुयश पाटील यांनी विभागीय अधिकारी मा.मयुर पाटील यांना देण्यात आले.