अनुराग ठाकूर, कंगना राणावत यांनी राहुल गांधी यांची माफी मागावी..,नाशिक शहर काँग्रेसचे आंदोलन…
दक्ष न्यूज प्रतिनिधी
नाशिक : लोकसभेमध्ये देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जातीय जनगणना व्हावी म्हणून आवाज उठवला त्याला प्रत्युत्तर देताना मात्र भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर व खासदार कंगना राणावत यांनी राहुल गांधींची जात विचारून बेताल वक्तव्य केले खासदार अनुराग ठाकूर यांनी असविधानिक वक्तव्य देशाच्या संसदेत केले तसेच राहुल गांधींचा अपमान केल्याने नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांनी जातीचा उल्लेख करत या देशांतील अनेक जातीय जनगणना व्हावी यासाठी आंदोलन करणाऱ्या जनतेच्या जातीचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांना बलिदानाची परंपरा आहे. राहुल गांधी ज्या घरात जन्मले त्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे त्यामुळे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपने राहुल गांधी व जनतेची माफी मागावी अशी मागणी या आंदोलनाच्या वेळी नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचा प्रश्न महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न याबाबत न बोलता केवळ जातीयवादी वक्तव्य करून राहुल गांधी यांचा अपमान करत असताना देशातील लाखो लोकांचा अपमान अनुराग ठाकूर यांनी केला आहे त्यांना वेळीच आवर घातले नाही तर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे मत आंदोलनाच्या वेळी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी केले.तसेच माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांनी भाजपवर टीका करत मनुवादी भाजपाचा निषेध नोंदविला
याप्रसंगी राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस पक्ष जिंदाबाद, मनवादी भाजपाचा धिक्कार असो, अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिषद दुमदुमून टाकला.
या आंदोलनाच्या वेळी अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांच्या फोटोला चप्पल मारून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.

याप्रसंगी नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल, नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, माजी सभागृह येथे राजेंद्र बागुल, नगरसेवक राहुल दिवे, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास सातभाई, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनिफ बशीर, माजी नगरसेविका वत्सला खैरे, नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, नाशिक जिल्हा एनएसयुआय चे अध्यक्ष अल्तमश शेख, बबलू खैरे, सुरेश मारू, उद्धव पवार, जुली डिसोझा, अनुसूचित जमातीचे अध्यक्ष संतोष ठाकूर,अनुसूचित जाती अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, ओबीसी विभाग अध्यक्ष गौरव सोनार, शहर महिला अध्यक्ष स्वाती जाधव, विजय राऊत, संदीप शर्मा, लक्ष्मण धोत्रे, जावेद इब्राहिम, रामकिशन चव्हाण, राजकुमार जेफ, इसाक चाचा, फारूक मनसुरी, शहबाज मिर्झा, भालचंद्र पाटील, अदिनाथ नागरगोजे, चंदू साळे, शाहिद बावा, जावेद पठाण, अब्दुल बावा, लकी जाधव, संजय जाधव, शिवाजी कासव, नंदू कोतवाल, अस्लम पैलवान, मुश्ताक कुरेशी, आणा मोरे, समाधान जमधार, बापू शिंदे, प्रकाश खळे, सखाराम बोळे, प्रशांत भविस्कर, प्रकाश पिंगळ, कचरू शिंदे, गोरख साळवे, विलास निकुंभ, गणी शेख, समीना पठाण, गुडी खान, सुचिता बच्छाव, मीरा साबळे, सोफीया सिद्दीकी, कुसुम चव्हाण, पापा सय्यद, जयेश सोनवणे, अनिल बहोत, आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोट्या संख्यांची उपस्थित होते.