सर्वोदय परिवार आणि जीवन उत्सव यांच्यातर्फे सामूहिक व्याख्यानाचे आयोजन
नाशिक: दक्ष प्रतिनिधी
आज गांधी जयंती निमित्त सर्वोदय परिवार आणि जीवन उत्सव यांच्यातर्फे सामूहिक सूतकताई आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या वेळी निर्मल ग्राम निर्माण केंद्राच्या अध्यक्ष सुश्री नालिनीताई नावरेकर यांनी गाँधीजीं च्या प्रेरणेने सार्वजनिक क्षेत्रात महिलांचा सहभाग या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस नाशिक मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या वासन्ती सोर, तसेच जीवन उत्सवाच्या सदस्य संगीता पानगव्हाणे आणि रोहिणी अचवल यांना श्रद्धांजली देण्यात आली. या नंतर सामूहिक मौन सूतकताई करण्यात आली.
नालिनीताई या वेळी म्हणाल्या की गांधी जयंती गांधींचे गुणगान करण्यासाठी नाही तर त्यांचे विचार जीवनात आत्मसात करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. त्या म्हणाल्या की गाँधी यांनी स्त्रियांना आपल्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला. त्यांनी सर्वांना शुष्क बुद्धिवादी होण्यापेक्षा विचारशील होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात आस्था मांदळे हिने गांधीं यांनी लिहिलेल्या सेवक की प्रार्थना गायली. सूत्र संचालन स्वाती गड़ाख यांनी केले.
गांधी जयंती निमित्त कापूस ते कापड प्रदर्शनी तसेच क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो तर्फे आयोजित गांधी चित्र प्रदर्शन रविवारी देखील असणार. या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.